भाजपच्या आमदारांना डांबून ठेवावे लागत नाही ! : महाविकासआघाडीला टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2019
Total Views |


आमचा आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास : आशिष शेलार


मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवत आहे. त्यांना त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. भाजपच्या सर्व आमदारांवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कुठल्याही आमदारांना कुठेच हॉटेलमध्ये ठेवलेले नाही. त्यामुळे आमचा आमच्या आमदारांवर संपूर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. दरम्यान, पवईतील हॉटेल रिजन्सी येथून राष्ट्रवादीचे आमदार आता हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे हलवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हलवण्यात आल्याची माहिती आहे. 

 

मुंबईतील वसंतस्मृती येथे झालेल्या भाजपच्या बैठकीनंतर घेणयात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील वसंतस्मृती येथे भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांना संपूर्णपणे पाठींबा दर्शवत त्यांचे अभिनंदनही केले. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. अजित पवार यांनी पाठींबा दिल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपला आता बहुमताच्या चाचणीत विजय मिळवायचा आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या बैठकीला महत्वपूर्ण मानले जात आहे. भाजपच्या सर्व आमदारांसह अपक्षांनी पाठींबा दर्शवत स्थिर सरकार आणण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.

 
@@AUTHORINFO_V1@@