मुंबई : महाराष्ट्रात अकल्पित राजकीय घडामोड घडली असून आज सकाळी सकाळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काल शुक्रवारी रात्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नावावर सहमती झाली आहे असे माध्यमांना सांगितले होते. मात्र मुंबई तरुण भारताला मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे स्वतः साशंक होते, तर राष्ट्रवादीच्या एक सर्वोच्च नेत्याने मुंबई तरुण भारताला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचे एकत्र सरकार बनणे कठीण असल्याचे सांगितले होते. आता फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाच शपथविधी झाला आहे.