भारत VS बांग्लादेश: भारत दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Nov-2019
Total Views |


कोलकाता येथील ईडन गार्डन येथे भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील मालिका सध्या सुरु आहे. काल भारताने फलंदाजीला सुरुवात केली असून भारत सध्या ३ बाद १७४ धावांवर खेळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्यात सध्या ३७ धावांची भागीदारी झाली असून विराट ५९ तर अजिंक्य २३ धावांवर खेळात आहेत. या धावसंख्येसह भारताकडे ६८ धावांची आघाडी आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सुरु असलेल्या या पिंक बॉल टेस्ट मालिकेच्या पहिल्याच दिवशी बांग्लादेशची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाच्या गोलंदाजांपुढे बांग्लादेशच्या फलंदाजांची जादू काही चालली नाही आणि त्यांना १०६ धावांवरच समाधान मानावे लागले. भारताच्या गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरीत करत इशांत शर्माने ५ गाडी बाद केले, उमेश यादवने तीन तर मोहम्मद शमीने दोन गाडी बाद केले.

@@AUTHORINFO_V1@@