शरद पवारांमुळे पाच वर्षे 'महाशिवआघाडी'चे सरकार टीकेल : आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |



मुंबई : शरद पवार यांच्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार टीकेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील सत्तास्थापनेबद्दलच्या तिढ्यावर आणि राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले आहे. सोबतच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्यांनी जनतेची कामे करावीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, ही राज्याची इच्छा आहे, असे मत व्यक्त केल्यांनंतर आठवलेंनी ही प्रतिक्रीया दिली आहे. "जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असते हे माहिती असते तर भाजपनेही त्यांना पाठींबा दिला असता.", असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होणार याची शक्यता व्यक्त केली जात आहे, या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत.



@@AUTHORINFO_V1@@