"सेना आमदार सारखी जागा का बदलतायं ? आमदार आहेत की पाकीटमार ?"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |


निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंवर टीका 



मुंबई : "शिवसेना आमदार दहा पंधरा केसेस मध्ये नंबरकारी व फरार असल्यासारखे त्यांना हलवतायत. ठिकाण बदलायला ते आमदार आहेत की पाकीटमार???", असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना आमदरांची बैठक होणार आहे. त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. त्यामुळे आधी पाच दिवसांचे कपडे घेऊन मुंबईला बोलवण्यात आलेल्या आमदारांना आता थेट जयपूरला पाठवण्यात येणार असल्याच्या वृत्तावरून माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

 

शिवसेनेच्या विजेत्यांना आमदारांना मंगळवारी मुंबईत बोलावण्यात आले होते, त्यावेळी आधारकार्ड आणि पाच दिवसांचे कपडे घेऊन या असेही सांगण्यात आले. दरम्यान, आता थेट जयपूरला जावं लागणार असल्याने आमदारांची त्यादीशेनेही लगबग सुरू झाली आहे. मात्र, माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत या साऱ्याचा समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार ते आपल्या ट्विटरद्वारे शिवसेनेला लक्ष्य करत आहेत.

 

आधी पैसे द्या जिंका आणि मग भांडी घासा

"पाच दिवासांचे कपडे आणा आणि आधारकार्ड आणा, अशी वागणूक कुणी आपल्या नोकरांनाही देत नाही, शिवसेना आमदार हे स्व. बाळासाहेबांच्या नावावर व स्वतःच्या जीवावर निवडून आले आहेत उद्धव ठाकरेच्या नाही. आधी तिकीट मिळवायला पैसे द्या आणि जिंकल्यावर यांची भांडी पण घासा.", अशा भाषेत उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

@@AUTHORINFO_V1@@