देशाची घटना धर्मनिरपेक्ष संकल्पनेवरच आधारित : संजय राऊत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |

 


नवी दिल्लीराज्यात सरकारस्थापनेविषयी महाशिवआघाडीमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. परंतु, अद्याप सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. बुधवारी रात्री दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. 'रात्री खूप उशिरापर्यंत आघाडीची बैठक चालल्यामुळे आज मी शरद पवारांची भेट घेणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आघाडीतील प्रमुख नेत्यांशी फोनवरून चर्चा देखील केली आहे.' अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत काल दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थितांना दिली.तसेच सोनिया गांधींना भेटण्याचे अद्याप कोणते प्रयोजन नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, "देशाची घटना धर्मनिरपेक्ष संकल्पनेवरच आधारित आहे. शेतकऱ्यांना मदत करताना त्यांची जात आणि धर्म पाहिला जात नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शब्दाला विरोध करण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता पुढे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते पक्षश्रेष्ठी मुंबईमध्ये घेतील अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

@@AUTHORINFO_V1@@