नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाच वर्षांपूर्वी एकटेच खोकायचे आता मात्र, प्रदुषणामुळे संपूर्ण दिल्ली खोकत आहे, असा टोला भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी लगावला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिल्लीत सुरू असलेल्या प्रदुषणासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला.
जम्मू काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना कमी
दरम्यान, संसदेत जेएनयू, काश्मीर आणि इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. काश्मीरप्रश्नी उत्तर देताना केंद्र सरकाने दगडफेकीचे प्रकार आणि फुटीरतावाद्यांकडून केला जाणाऱ्या कुरापती कमी झाल्याची माहिती देण्यात आली.