'गुड न्यूज'- ट्रेलर प्रदर्शित

    18-Nov-2019
Total Views | 40


अक्षय कुमार, करीना कपूर खान. दिलजीत डोसांज आणि किआरा अडवाणी या सगळ्या आघाडीच्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असलेल्या 'गुड न्यूज' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांसमोर आला. बत्रा VS बत्रा म्हणजेच दीप्ती आणि वरुण बत्रा यांच्या विरुद्ध हनी आणि मोनिका बत्रा या दोन्ही दाम्पत्यांमधील चढा-ओढ ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. आणि ही चढाओढ नेमकी कशासाठी आहे याचे उत्तर तुम्हाला ट्रेलर पाहिल्यावरच कळेल.

चित्रपटाची साधारण कथा तुम्हाला या ट्रेलरमधून लक्षात येईल मात्र त्यातील विनोद आणि काही छोटे मोठे ट्विस्ट पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. त्यामुळे 'गुड न्यूज' या चित्रपटातील गुड न्यूज नक्की काय आहे हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल मात्र ती न्यूज मिळाल्याचा आनंद संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर नक्की द्विगुणित होईल. चित्रपटातील संवाद ज्योती कपूर, रिषभ शर्मा आणि राज मेहता यांनी लिहिले आहेत.

येत्या २७ डिसेम्बरला ही गुड न्यूज नेमकी काय हे प्रेक्षकांना जाणून घेता येईल. राज मेहता दिग्दर्शित 'गुड न्यूज' या चित्रपटाला हिरु जोहर, करण जोहर, शशांक खैतान, अपूर्व मेहता आणि अरुण भाटिया यांचे निर्मिती साहाय्य मिळाले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121