नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोमवारी सुटण्याची शक्यता होती मात्र, आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच महाशिवआघाडीतील हवा काढून घेत असा कुठलाच प्रस्ताव झाल्याची प्रतिक्रीया दिली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची दिल्लीत भेट घेतली मात्र, वेळोवेळी आघाडीसोबत सत्तास्थापनेचा दावा करणारे राऊत मात्र, नरमलेले दिसले. 'राज्यातील अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार यांच्याशी भेट झाली', असे राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, "शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री आहेत. यामुळे राज्यातील अवकाळी पावसाबद्दल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्याचे आवाहन पवार यांना केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना मदत लवकर मिळावी यासाठी मदत मागण्याचे आवाहन करणार आहे."