नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन वीमा महामंडळ-एलआयसीने येत्या ३० नोव्हेंबरपासून २४ हून अधिक पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वीमा नियंत्रण प्राधिकरण, आयआरडीएच्या लाईफ इन्श्युरन्स प्रॉडक्टच्या नव्या नियमावलीनुसार एलआयसी जुन्या पॉलिसी बंद करणार आहे. मात्र, जुन्या पॉलिसीतून मिळणार्या फायद्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. बंद करण्यात येणार्या पॉलिसीमध्ये जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ यासारख्या पॉलिसींचा समावेश आहे.