स्थिर सरकार हीच अपेक्षा : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |




मुंबई : भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निकालानंतर भाजप युतीला जनादेश मिळूनही अद्याप महाराष्ट्राला मुख्यमंत्री न मिळणे हे खूप चांगली गोष्ट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, असल्याचेदेखील म्हटले आहे.

 
 
 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्यात गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@