आशियाई नेमबाजी स्पर्धा : ऐश्वर्य तोमर कांस्य पदाचा मानकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे १३वे स्थान निश्चित केले आहे. ऐश्वर्यने रविवारी दोहा येथे सुरू असलेल्या एशियन नेमबाजी स्पर्धेतील ५०मीटर रायफल या प्रकारात तिसरे स्थान मिळवत कांस्यपदक जिंकले.


ऐश्वर्यने एकूण ४४९/१ धावा केल्या. ऐश्वर्यने चिनी-कोरीयन खेळाडूंनंतर आपले तिसरे स्थान यादीत निश्चित केले आहे. ऐश्वर्यच्या विजयासह भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये नेमबाजीत १३वे स्थान पक्के केले आहे. २०१६
, च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी १२वे स्थान मिळवले होते. शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या ऐश्वर्याने गेल्या वर्षी जुलै महिन्यात एक नवीन कनिष्ठ राष्ट्रीय विक्रम नोंदविला. तसेच, जुलैमध्ये २०१९ मध्ये ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केले होते.

@@AUTHORINFO_V1@@