पाकिस्तानला मिळणार नाही निजामाची संपत्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |



 निजामाच्या ३०८ कोटींवर भारताचा हक्क : ब्रिटन न्यायालय


ब्रिटन : भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर हैदराबादचे निजाम ३०८ कोटींच्या मालमत्तेसाठी भारतासह पाकिस्तानही हक्क गाजवत आहे. या प्रकरणी ब्रिटन उच्च न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. १९४८ मध्ये ही रक्कम हैदराबादचा तत्कालीन निजाम याने उस्मान अली खानने पाकिस्तानच्या ब्रिटनस्थित उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या लंडन येथील बॅंकेच्या शाखेत जमा केली होती. त्यामुळे पाकिस्तानने यावर आपला हक्का सांगितला होता. हे प्रकरण ब्रिटनच्या उच्च न्यायालयात नेण्यात आले होते. आता या प्रकरणी निकाल भारताच्या बाजूने लागला आहे.

 
 

हा निकाल भारताच्या बाजूने लागू शकतो, अशी संपूर्ण आशा भारताला होती. लंडन येथील नेटवेस्ट बॅंकेसह पीएलसी येथील जमा रक्कमेच्या संदर्भात हैदराबादस्थित आठवे निजाम प्रिंस मुकर्रम जेह आणि त्यांचा बंधू मुफाखाम यांनी कायदेशीर लढाईत भारताशी हातमिळवणी केली. भारतातील निजामाच्या वंशजांनी त्यावर आपला हक्क सांगितला आहे. राष्ट्रपती, निजाम, भारत सरकार यांच्यात सुरू असलेला हा खटला न्यायाधीश मार्कस स्मिथ यांच्या न्यायालयात सुरू होता.

 
 

भारताचा हक्क यासाठी...

अंतिम निजाम ओस्मान अली खान यांना भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवेळी कोणत्या देशात जायचे याबद्दल संभ्रम होता. त्यावेळी ही रक्कम लंडनस्थित बॅंकेत जमा करण्यात आली. त्यावेळी ज्या देशात ते आपले संस्थान सामाविष्ठ करतील त्यांना आपली संपत्ती द्यावी लागणार होती. निजामाच्या मृत्यूनंतर या पैशांवर भारताने हक्क सांगितल्यावर नेटवेस्ट फंड सुरक्षेसंदर्भात पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांनी ही रक्कम स्वतःजवळ ठेवली होती.

@@AUTHORINFO_V1@@