शत्रुत्वाची भावना संपवा... : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाकण्याचे आवाहन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमामधून देशवासीयांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आजकाल केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष म्हणजे जगातील देशात दिवाळी महोत्सवात केवळ भारतीयच सहभाग घेत नसून तेथील सरकार आणि स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत. सध्या जगभरात 'फेस्टिव्हल टुरिझम'चेही आकर्षण वाढत आहे. आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात 'फेस्टिव्हल टुरिझम'चा विकास करण्यास मोठा वाव आहे," असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी 'फेस्टिव्हल टुरिझम'कडे सर्वांचे लक्ष वेधले.

 

पुढे ते म्हणाले की, "दिवाळी असो, होळी असो, ओणम असो, पोंगल असो किंवा बिहु असो, अशा सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे," असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

 

लक्ष्मी सन्मानाची आठवण

"या दिवाळीला काहीतरी वेगळे करणार असे गेल्या वर्षी 'मन की बात'मध्ये मी संकल्प केला होता. दिवाळीनिमित्त देशातील नारीशक्ती आणि त्यांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करूया. अर्थात, लक्ष्मींचा सन्मान करूया, असा संकल्प मी केला होता," याचीही आठवण पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'मध्ये केली.

 

देशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन

देशातील जनतेने नेहमी देशी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात'द्वारे केले. "एखादी वस्तू गावात मिळत असेल, तर ती खरेदी करण्यासाठी तालुक्याला जाण्याची गरज नाही आणि एखादी वस्तू तालुक्याला मिळत असेल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यता नाही. जनतेने स्थानिक वस्तू खरेदी कराव्यात. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि आपली स्वप्ने अशा प्रकारे नक्कीचपूर्ण करू शकतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@