भारत गणेशपुरे म्हणतात, 'यांच्यासाठी' मतदान करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |




मुंबई : 'चला हवा येऊ द्या' मधील प्रसिद्ध कलाकार भारत गणेशपूरे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, मत कुणासाठी द्यायचं याबद्दलचा संदेश त्यांनी उपस्थितांना एका कार्यक्रमादरम्यान दिला आहे. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने कोणीही न सांगता स्वत:हून मतदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपला प्रतिनिधी निवडण्याचा प्रत्येकालाचा तो हक्काचा दिवस असून राष्ट्रासाठी मतदान ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे स्वतःसाठी मतदान करा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 


मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे बोरीवलीतील महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या जनजागृतीसाठी स्वीप’ (सिस्टीमॅटिक वोटर्स एज्युकेशनल अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्रॅम) हा कार्यक्रम राबवला जातो. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, उपजिल्हाधिकारी सोनाली मुळे, महापालिका सहआयुक्त भारत मराठे अभिनेत्री हेमांगी कवी आणि निशा परुळेकर यांनीही उपस्थितांना मतदानाचे आवाहन केले.

 

'स्वीप' कार्यक्रमाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ अश्विनी बोरुडे, दिव्यांग मतदारांचे प्रतिनिधी सुनील दशपुत्रे उपस्थित होते. उपनगरातील २६ मतदार संघातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी कलाकारांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी उपस्थितांना २१ ऑक्टोबर रोजी मतदान करण्याची शपथ दिली.

 



बोरीकर म्हणाले की, “मुंबईसारख्या शहरात लोकसंख्या जास्त असताना याठिकाणी जास्त मतदान होणे आवश्यक आहे. देशातील आकडेवारीनुसार भारतात सरासरी ७० टक्के मतदान होते, तेव्हा यावेळी सरासरी गाठायचा प्रयत्न करणार आहोत. प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल अशा बऱ्याच यंत्रणा यासाठी सज्ज असून मतदारांनी मोठ्या संख्येत मतदानाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.यावेळी मुंबई महापालिकेच्या शाळेतील संगीत शिक्षकांनी मतदान जागृतीविषयीच्या गीतांचा उत्तम कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबरच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी मतदानाच्या दिवसाकडे सुटीचा दिवस म्हणून न पाहता आपला हक्क बजावावा असे आवाहन केले. अभिनेत्री हेमांगी कवी यांनीही सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे संस्थाचालक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षक, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@