#Metoo विषयी पी. व्ही सिंधुने मांडले आपले मत

    19-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
हैदराबाद : ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी आणि बॅडमिंटनमध्ये जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणारी खेळाडू पी. व्ही सिंधु हिने #Metoo विषयी आपले मत मांडले आहे. देशात महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल पी. व्ही. सिंधुने चिंता व्यक्त केली आहे. परदेशात महिलांचा सन्मान केला जातो. आपल्या देशात मात्र लोक फक्त महिलांचा आदर करावा ही गोष्ट लक्षात ठेवतात, प्रत्यक्षात मात्र ही गोष्ट फार कमी लोक कृतीत उतरवतात. अशी खंत पी.व्ही सिंधुने बोलून व्यक्त केली आहे.
 

पी.व्ही सिंधुने म्हटले की "जेव्हा मी बाहेरच्या देशात खेळायला जाते. तेव्हा मी पाहते की महिलांविषयी तेथील लोकांना अत्यंत आदर आहे. मला आनंद आहे की दुसऱ्या देशांमध्ये महिलांचा आदर केला जातो. भारतात लोक म्हणतात की महिलांचा आदर करायला हवा. परंतु फार कमी लोक ही गोष्ट आपल्या कृतीत उतरवतात." पी.व्ही सिंधु एवढेच बोलून थांबली नाही तर तिने महिलांनाही #Metoo विषयी मेलाचा सल्ला दिला. "महिलांनी सक्षम व्हायला हवे आणि स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. महिलांनी समोर येऊन लैंगिक शोषणाविषयी बोलायला हवे. यामध्ये लज्जास्पद अशी कोणतीही गोष्ट नाही. आपल्याला गर्व वाटायला हवा की आपण सक्षम आहोत आणि पुढे जात आहोत."

 

#Metoo या मोहिमेमुळे लोकांच्या मानसिकतेमध्ये खूप बदल झाला आहे. असेही पी.व्ही सिंधुने म्हटले. हैदराबाद पोलीसांनी महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात महिलांनी पुढाकार घेऊन तक्रार करावी. यासाठी SH(OUT) हा उपक्रम राबवला आहे. SH(OUT) या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पी.व्ही. सिंधु बोलत होती. हा उपक्रम राबविण्यासाठी पी.व्ही. सिंधुने हैदराबाद पोलीसांचे कौतुक केले.

 

कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी हैदराबाद पोलीसांनी एक विशेष समिती स्थापन केली आहे. कॉर्पोरेट कंपन्या,तेलुगु सिनेसृष्टी,विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, रुग्णालय यांमधील एक प्रतिनिधी या समितीमध्ये नेमण्यात आला आहे. या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी हैदराबाद पोलीसांनी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. अशी माहिती शिखा गोयल (अतिरिक्त आयुक्त, गुन्हे आणि एसआयटी, SHE-टीम इन्चार्ज, हैदरबाद) यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121