राष्ट्रवादीच्या 'त्या' १८ नगरसेवकांची हकालपट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी नगरसेवकांच्या नावाने पत्रक काढून ही कारवाई केली. पक्षाचा आदेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने ही कारवाई केल्याची माहिती या पत्रकामामध्ये देण्यात आली आहे.

 

यासोबतच अहमदनगर शहर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनादेखील पदावरून काढून टाकण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग होत असताना त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना न दिल्याबद्दल यांना पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे पाटील यांनी काढलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. दरम्यान, पक्षादेश डावलल्यानंतर, या नगरसेवकांना पक्षाच्यावतीने सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@