पुणे : औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड, क्रीडा मंत्री विनोद तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
युवकांसाठी खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करून केंद्र सरकार स्वामी विवेकानंदांच्या सुदृढ भारत निर्माणाचा मंत्र आचरणात आणत आहे. तीच प्रेरणा घेऊन क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी औरंगाबादमध्ये महाराष्ट्रातील पहिले क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याचबरोबर क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/