तेलंगणामध्ये बस अपघात, ४५ जण ठार

    11-Sep-2018
Total Views | 6




हैद्राबाद: तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन निगमची बस उलटली. या बसमध्ये  प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत बाकीचे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांना बातमी मिळताच ताईने तिथे बचावकार्याला सुरुवात केली आहे.

 
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बसचा अपघात हा ब्रेक फेल झाल्यामुळे झाला आहे. या बसमध्ये ६२ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला असून बाकीचे गंभीर जखमी झाले आहेत. ही बस शनिवारमपेठ येथून कोंडागाट्टू मार्गे जगतियालला जात होती. उतरणीचा रस्त्यावरून जात असताना एका वळणावर बसचे ब्रेक फेल झाले आणि बस घाटात ३० फूट खाली जाऊन पडली.
 
 

जगतीयालच्या पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून बचावकार्य सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अपघातांवर शोक व्यक्त केला आहे. सरकारने अपघातात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121