‘डिजी लॉकर’मधील कागदपत्रे ग्राह्य

    20-Aug-2018
Total Views | 36


 

मुंबई : बर्‍याचदा वाहनधारकांना रोखल्यानंतर वाहनाच्या मूळ कागदपत्रांची मागणी वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकार्‍यांकडून केली जाते. मात्र, गाडीत कागदपत्रे न बाळगल्याने अनेकदा नाहक दंड सोसावा लागतो. त्यात कधी वादाचे प्रसंगही उद्भवतात. हे टाळण्यासाठी ‘डिजी’ लॉकरमधील कागदपत्रे वाहन चालकांनी दाखवल्यास ते ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश नुकतेच परिवहन आयुक्तालयाने दिले आहेत.
 

नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना रोखले जाते. आपत्कालीन प्रसंगी, तसेच नाकाबंदी दरम्यान आरटीओ अधिकर्‍यांकडून वाहनचालकांकडे वाहन अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची मागणी केली जाते. अशा प्रसंगी इ-प्रकारातील कागदपत्रे उपलब्ध असल्यास, संबंधित वाहनचालकाकडून पुस्तक रूपातील कागदपत्रांची मागणी न करण्याच्या सूचना दि.८ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या होत्या. या सूचनेनुसार परिवहन आयुक्तलयाकडून दि. १८ ऑगस्ट रोजी डिजी लॉकरसंबंधी आदेश निर्गमीत करण्यात आले.परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या आदेशानुसार, ’डिजी लॉकर अ‍ॅप‘चा वापर करून वाहनचालक अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी मोबाइलमध्ये जतन करू शकतात. वाहतूक अधिकार्‍यांनी कागदपत्रांची मागणी केल्यास डिजी लॉकर कागदपत्रे दाखवू शकतात. संबंधित कार्यालयांनी डिजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य धरावी, तसेच त्यांच्याविरुद्ध केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३० , १७० अन्वये कारवाई करण्यात येऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121