‘त्या’ वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका कायम

    07-Jul-2018
Total Views | 35


 

डोंबिवली : २००५ च्या महापुरात खाडी किनारी लगत असलेल्या वसाहतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते . खाडी किनारांच्या भोवताली राज रोसपणे उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने अशा वसाहती मध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका कायम राहिला आहे.

 

कल्याण डोंबिवली परिसराला मोठ्या प्रमाणावर खाडी किनारा लाभला आहे .मात्र या किनाऱ्या लगत मोठ्या प्रमाणावर बांधकामे उभी राहिली आहेत. त्याचप्रमाणे आजही राज रोस पणे उभारली जात आहेत. डोंबिवली परिसरात मोठागाव ठाकुर्ली, महाराष्ट्र नगर, गरीबाचा वाडा, उमेशनगर, देवीचा पाडा, सत्यवान चौक, आयरे गाव, जुनी डोंबिवली, भोपर, कोपर, तर कल्याण मध्ये गोविंद वाडी,आधारवाडी आदी भाग खाडी किनारी लगत मोडतो.

 

दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडीकिनारी भूमाफियांनी चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये पडद्यामागून राजकीय मंडळींचा सहभाग असल्याने पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करताना अडचणी येत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांनी चाळी तोडल्या तरी त्या पुन्हा रात्रीतून उभ्या करण्याचा अगोचरपणा भूमाफियांकडून सुरू आहे. चाळी तोडण्याची कारवाई केली, की पडद्यामागून राजकीय मंडळी अधिकार्यांवर रोष धरत असल्याने अधिकारी अशा बांधकामांकडे मग नाइलाजाने दुर्लक्ष करतात. रेतीबंदर, मोठागाव खाडी किनारी ‘सीआरझेड’ क्षेत्रात, सरकारी जमिनींवर राजरोसपणे बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरू असल्याने, येणाऱ्या काळात नव्याने तयार होणाऱ्या माणकोली उड्डाण पुलाला ही बांधकामे मोठा अडथळा ठरु शकतात. पूल होणार असल्याने वाहनांची वर्दळ वाढणार आहे.

 

कारवाई करण्यात येईल

 

डोंबिवली असो वा कल्याण कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.

 

बांधकामे सुविधांच्या मुळावर

 

पुलाच्या रेतीबंदर बाजूला एखादे वाहनतळ, पेट्रोलपंप असेल तर वाहन चालकांना ते अधिक फायदेशीर असणार आहे. डोंबिवली पश्चिमेत एकही पेट्रोलपंप नाही. अशा सरकारी, राखीव पडीक जागा येणाऱ्या काळात वाहनतळ, पेट्रोलपंप, सीएनजी पंपसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी खूप मोलाच्या आहेत. अशा मोक्याच्या जागा जर भूमाफियांनी गिळंकृत केल्या तर सार्वजनिक सुविधा द्यायच्या कुठून, असा मोठा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे रोखणे आवश्यक आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121