महापालिकेचे दुर्लक्ष उद्यानांची लावली वाट

    31-Jul-2018
Total Views | 19
 
 
 
महापालिकेचे दुर्लक्ष उद्यानांची लावली वाट
 
जळगाव शहरातील सुसंस्कृत भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या सानेगुरूजी कॉलनी भागातील उद्यानांची महापालिकेने केलेल्या दुर्लक्षाने अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे या उद्यानांमध्ये परिसरातील नागरिकांऐवजी गुरे-ढोरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
यासंदर्भात येथील नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे निवेदनेही दिलीत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ही निवेदने बेमुर्वतखोेर अधिकार्‍यांनी कचर्‍याच्या टोपलीत टाकून दिली. एकीकडे शहर सुशोभिकरणासाठी महापालिका इतरांपुढे हात पसरत असतांना नागरिकांच्या सहभागातून जर उद्याने रमणीय होत असतील तर काय हरकत आहे? मात्र, महापालिकेतील खाविआ राजवटीला हे शहर बकाल झालेलेच पहायचे असावे. सानेगुरूजी उद्यानातील ही छायाचित्रे त्याचे बोलके उदाहरण ठरावे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121