महाराष्ट्र होईल ‘पाणीदार’९१ सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणार

    20-Jul-2018
Total Views | 10

-जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने केंद्राची मदत
-ना. महाजन यांनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

 
 
जळगाव, २० जुलै  :
 
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमधील शेतीला नवसंजिवनी मिळावी, महाराष्ट्राला लागलेल्या या दुष्काळरूपी संकटाचा सर्वनाश व्हावा, मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली यावी, आणि बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. एकात्मिक जलआराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले असतानाच आता बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील, शेतकरी आत्महत्त्याग्रस्त भागातील ९१ सिंचन प्रकल्प २०१९ पर्यंत मार्गी लाणार आहे व यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काचे संकट दूर होणार आहे. केंद्राकडून योजनेसाठी १३ हजार ६५१ कोटीच्या निधीची मान्यता मिळाली असून या मोठ्या उपलब्धीबद्दल राज्याचे जलसंपदामंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.
 
 
जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनी’ योजनेंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्त्याग्रस्त जिल्हयांतील ९१ जलसिंचन प्रकल्प मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत.
 
 
विशेष बाब म्हणजे यात जळगाव जिल्ह्यातील शेळगाव व वरखेडे- लोंढे बॅरेज या दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांना अनुक्रमे ३३७ व ४०५ कोटी रूपये मंजूर झाले आहे. या प्रकल्पाची कामे मार्गी लागून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिंचनाचा प्रश्‍न मिटणार आहे. राज्याचा एकात्मिक जलआराखडा तयार करून जलसंपदा मंत्री यांनी सिंचन प्रकल्पांसाठी मार्ग मोकळा केलेलाच होता. आता जलसंजीवनी योजनेतून महाराष्ट्राला खर्‍या अर्थाने संजीवनी देण्याचे काम जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली प्रकल्प बोगद्याची लांबी वाढविण्याचा निर्णय बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्यात येणार

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे ठाण्यातील मुल्लाबाग येथील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-बोरिवली दरम्यान बनणारा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.तसेच त्यांना होणारा धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी बंदिस्त केलेल्या कन्व्हेयर बेल्टद्वारे राडारोडा वाहून नेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121