नागपूर : नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. सरकारने ज्याप्रमाणे प्लास्टिक बंदी आणली, त्याप्रमाणे वाळूउपसावर बंदी आणली जाईल का? असा प्रश्न आज राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आज उपस्थित केला. आज नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवाशनात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
"स्टोनक्रशिंगला प्राधान्य दिले जाईल? वाळू उपसा करणाऱ्या ट्रकवरील लाखो रुपयांचा दंड कमी केला जाईल का?" असे काही प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. ज्याप्रमाणे प्लास्टिकबंदी केली त्याच प्रमाणे वाळू उपसा बंदी पण केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आज चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत याविषयी माहिती दिली. त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहे.