संभाजी भिडे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी : अजित पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2018
Total Views |






नागपूर : संभाजी भिडे यांना विनाशकाले विपरीत बुद्धी निर्माण झाली असून भिडे हे सातत्याने समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज केली आहे. संभाजी भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या संबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आज नागपूर येथे ते बोलत होते.



समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा, तसेच समाजातील एकोप्यामध्ये दरी निर्माण करण्यासाठी म्हणून भिडे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे ? याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे पवार यांनी यावेळी मांडले. तसेच कालच सभागृहात देखील मुद्दा मांडण्यात आला असून सरकारने यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु सरकारने या विषयी कोणाच्याही सांगण्याला तसेच दबावाला बळी न पडता यावर तत्काळ कारवाई करावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे.


@@AUTHORINFO_V1@@