मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेत खंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |


श्रीनगर : अवघ्या देशाचे श्रद्धास्थान असलेल्या 'अमरनाथ धाम'च्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. देशभरात हजारो भाविक या यात्रेसाठी म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले असतानाच, आज मात्र मुसळधार पावसामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आज पहाटेपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा ही काही काळासाठी म्हणून थांबवण्यात आली आहे.

आज पहाटेपासूनच अनंतनाग, बालटाल, कारगिल येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष करून बलताल आणि पहलगाम येथून अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या मार्गावर जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने म्हणून हे मार्ग आणि यात्रा आजच्या दिवस बंद ठेवण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर मार्गाची पुन्हा एकदा पाहणी करूनच यात्रा पुन्हा एकदा सुरु करण्यात येईल, असे यात्रेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान कालच या यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये या यात्रेकरूनचा पहिली तुकडी अमरनाथ गुहेकडे रवाना करण्यात आली होती. यंदाच्या यात्रेसाठी देशभरातून एकूण १ हजार ९०४ च्या भाविकांची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये १ हजार ५५४ पुरुष, ३२० स्त्रिया आणि २० लहान मुले यांचा समावेश आहे. या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात यंदा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@