शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : चंदना

    12-Jun-2018   
Total Views | 39

 
 
एक छोटंसं गाव, त्यात एक टुमदार घर, घनदाट झाडी, हिरवळ आणि गावाची मजा. विचार करुनच कित्ती छान वाटतं नाही. हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल या लघुपटात. या लघुपटाचं नाव त्यातील प्रमुख नायिकेच्या नावावर आहे. तिचं नाव आहे, चंदना. एक अत्यंत हुशार मुलगी. अभ्यासात पहिल्या क्रमांकावर. तिची छोटी बहीण चंद्रा, आणि आई. हेच काय ते तिचं विश्व. चंदना खरं तर खूप दिसायलाही खूप सुंदर. त्यामुळे वयात आल्यावर तिच्यासाठी तिच्या आईची काळजी देखील साहजिकच आहे. अशा या चंदनाचा शिक्षणासाठी केलेला संघर्ष म्हणजे हा लघुपट.
 
आजही गावाकडे मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आई वडील सुरुवाती पासूनच तिच्या लग्नासाठी पैसा साठवतात, मात्र तिच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी नसते. अशा परिस्थितीत एका कष्टाळू एकट्या आईने तिच्या दोन्ही मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला, प्रसंगी गावकऱ्यांना झुगारून ती त्यांच्या शिक्षणासाठी उभी राहिली आणि त्यामुळे निर्माण झाली चंदना. मात्र शेवटी ती वयात आल्यानंतर तिच्या रुपामुळे तिने पुढे शहरात शिक्षण घेऊ नये असे तिच्या आईचे मत होते, आणि इथेच या लघुपटाला वेगळे वळण मिळते. चंदनाला शिकायचे असते, आणि तिच्या आईला तिचे लग्न करायचे असते. दुसऱ्या दिवशी चंदनाला बघायला मुलगा देखील येणार असतो. आई सकाळी उठून बघते तर काय? चंदना घरात नाही? अरे देवा.... ही घर सोडून गेली का काय? चंदनाची आई घाबरते.. हाका मारते, चंद्रा गावभर शोधते मात्र चंदना काही सापडत नाही.. पुढे काय होतं? चंदना परत येते? तिला शिक्षणाची संधी मिळते? का तिचं लग्न होतं? जाणून घेण्यासाठी नक्कीच बघा हा लघुपट.
 
 
 
 
या लघुपटाची सुरुवात सुंदर अशा एका पार्श्वसंगीतापासून होते. ते संगीत ऐकूनच आपल्याला पुढील लघुपट बघण्याची इच्छा नक्कीच होते. गावाची हिरवळ, पावसाळी वातावरण आणि सुंदर दृश्य आपलं लक्ष नक्कीच आकर्षित करतात. त्यातून यामध्ये काम करणारे सर्वच कलाकार नवीन आहेत, त्यांचा अभिनय ताजा तवाना वाटतो, त्यामुळे बघण्यास आणखी उत्सुकता निर्माण होते.
 
या लघुपटाला यूट्यूबवर २६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सागरिका दास यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात अश्विनी गिरी, मीरा जोशी आणि सुखदा बोरकर यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत. एकदा तरी अवश्य बघावा असा हा लघुपट आहे.
 
- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121