सर्व जंगले प्रदुषणमुक्त करा ,१०० गावांच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करा - सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2018
Total Views |
 

जंगलांमध्ये बॅट्री ऑपरेटेड किंवा इलेक्ट्रीक वाहनांची सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देऊन राज्यातील सर्व जंगले प्रदुषणमुक्त करा, त्यासाठी योजना तयार करा अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार पंकज भोयर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
 
जंगलामध्ये प्लास्टिक, कुऱ्हाड बंदीची अंमलबजावणी कडक करावी तसेच हरित उर्जा संवर्धनाला गती द्यावी असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व वन कर्मचाऱ्यांना विशेषत: गाईडस् ना हॉस्पीटॅलिटी चे प्रशिक्षण देण्यात यावे. गाईडस् कडून पर्यटकांना देण्यात येणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाच्या माहिती मध्ये एकसमानता असावी. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना उत्तम वागणूक दिली जावी. व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात एकसमानता असावी. व्याघ्र पर्यटन करून परतलेल्या पर्यटकांना त्यांचा निसर्गानुभव किंवा सूचना देता याव्यात यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर एक सूचना किंवा तक्रार पेटी ठेवण्यात यावी, असेही ते म्हणाले.
 
 
व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक परिस्थिती जपून पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा कशा देता येतील यासाठी वनाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगून ते पुढे म्हणाले की, वनातील कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली जावी. जंगलातील इको सिस्टीम योग्य पद्धतीने कार्यान्वित राहण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या केल्या जाव्यात.
 
  
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात किंवा वनालगत राहणाऱ्या लोकांकडून खऱ्या अर्थाने वनांचे आणि जंगलांचे रक्षण आणि संवर्धन झाले आहे. त्यामुळे वनांचे ते खरे मालक आहेत. त्या गावकऱ्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे वनाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे रोजगारयुक्त, पुद्रुषणमुक्त, कुऱ्हाडमु्क्त, व्यसनमुक्त आणि जलयुक्त करावेत, त्या गावांचा सर्वांगीण विकास करावा. पहिल्या टप्प्यात अशी १०० गावे निवडून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार करावा असेही ते म्हणाले. व्याघ्र प्रकल्पातील गावे, तेथील लोकसंख्या, युवक-युवती, महिला,त्यांचे शिक्षण यासारखी मुलभूत माहिती संकलित करून त्यांच्या विकासासाठी कौशल्य विकासाचा एक प्लान तयार करावा, मोठ्या कंपन्यांशी यासाठी टायअप करण्यात यावे. वन अतिथी संकल्पनेवर पुन्हा काम सुरु करावे, जे पर्यटक व्याघ्र प्रकल्पातील बूकिंग कॅन्सल करतील त्यांचे बुकिंगचे पैसे निकषानुसार वेळेत परत करावेत, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@