चिखली तालुक्यात ११७ गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |

महाराष्ट्र भुजल अधिनियम या गावांमध्ये लागू


बुलडाणा : गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे चिखली तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या ११७ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी पाणी टंचाई घोषित केली आहे. तसेच या सर्व गावांमध्ये महाराष्ट्र भुजल अधिनियम २००९ लागू करण्यात आला असून यानुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपासून ५०० मी. अंतरामध्ये कसल्याही प्रकारची खोदकाम करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती अथवा अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतीही कृती करू नये, असे देखील प्रशासनाने म्हटले आहे. 


या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. 
@@AUTHORINFO_V1@@