वाचकालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Mar-2018
Total Views |
 

 
  
आम्ही बाबरी मशीद त्याच ठिकाणी बांधणार, असं ओवेसी सार्‍या देशाला आव्हान देत आहेत, तर रामजन्मभूमीवर आम्हाला राममंदीर बांधू द्या, तुम्ही मशीद इतरत्र बांधा, असं बहुसंख्यक हिंदू अल्पसंख्यक मुसलमानांकडे विनवण्या करत आहेत! सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रश्नाची सोडवणूक होईल का? आपसी सहमतीतून मार्ग निघेल का? तसे नाही झाले तर संसदेच्या माध्यमातून राममंदीराचा मार्ग प्रशस्त करुन द्यायची हिंमत मोदी सरकार दाखवेल का? विरोधक तोपर्यंत मोदी सरकारला सत्तेवर राहू देतील का? आपण सारे पेटून उठू की नेहमीप्रमाणे शेपूट घालून बसू? कुणाकडेही कुठलेही उत्तर नाही!
 
महंमद गझनीने सोरटी सोमनाथ मंदीर इसवी सन १०२६ मध्ये लुटले. त्यानंतर ते आणि इतर अनेक मंदिरं अनेक वेळा लुटली, पाडली गेली. कर्णावती येथे काही अरब व्यापार्‍यांनी हिंदू राजाकडे मशीद बांधण्यासाठी परवानगी मागितली. राजाने ती दिली. जुलै १०५६ मध्ये शिरोभागी अरेबिक अक्षरे असलेली ही मशीद बांधून तयार झाली आणि यथावकाश कर्णावतीचे अहमदाबाद झाले! अल्बेरुणी हा इस्लामिक विद्वान महंमद गझनीबरोबर भारतात आला होता. काही दिवस राहिला आणि परत गेला. त्याने लिहिलेल्या हिंदुस्थान की हकीकत या ग्रंथात तो म्हणतो, एकीकडे मुसलमान हिंदुंची मंदिरं लुटत होते, ती तोडून तिथे मशीदी बांधत होते, हिंदुंचा धर्मछळ करत होते आणि दुसरीकडे हिंदू राजे मुसलमानांना मशीदी बांधायला विना अट परवानगी देत होते! इतकी व्यवहारशून्य धार्मिक सहिष्णुता आणि तेही परधर्मीय आक्रमकांबाबत जगाच्या इतिहासात कुठेच दिसत नाही. हजार वर्षे होत आली तरी हिंदुंच्या आत्मघातकी मानसिकतेत कुठलाही बदल झाला नाही हे बघून अल्बरुणी त्याच्या थडग्यात खदखदा हसत असेल! म्हणत असेल, यांची मंदीरं पाडून त्या जागी आम्ही बांधलेली मशीद पडल्यावर ज्या देशातले लोक आमच्यापेक्षा जास्त रडतात, तो देश राममंदीर बांधण्याची हिंमतच करणार नाही. उलट हे डरपोक हिंदू बाबरी मशीद त्याच ठिकाणी बांधून देणारं तथाकथित सेक्युलर सरकार सत्तेवर आणतील! परवा तो कुणाचा तरी पुतळा पडला तर किती विलाप केला यांनी! असली नेभळट लोकं आणि त्यांची सरकारं राम जन्मभूमीवर मंदीर बांधुच शकणार नाहीत!
 
खरंच आम्ही राम जन्मभूमीवर भव्य राममंदीर बांधू शकू का? आम्हाला ते बांधता येऊ नये म्हणून अनेक नापाक हात, विळे, कोयते, हातोडे रात्रंदिवस वेगवेगळ्या जिहादी मार्गांनी प्रयत्न करत आहेत. संपुआ-३ सरकार सत्तेवर यावे म्हणून चीन-पाकिस्तान उघडउघड मदत करत आहेत आणि आमचे राजकीय नेते, पक्ष ती निर्लज्जपणे मागत आहेत, स्विकारत आहेत. मोदींचा पराभव झालाच यदा कदाचित, तर राम मंदीर तर विसराच, रामनाम सत्य है म्हणायचीही गरज पडणार नाही. जय श्रीराम!
 
 
सोमनाथ देविदास देशमाने
९४२१६३६२९१
 
@@AUTHORINFO_V1@@