तुमच्या मुलांना परीक्षेला पाठवू नका : राज ठाकरे

    30-Mar-2018
Total Views | 24



मुंबई : 'मुलांची फेरपरीक्षा घेण्याचा सरकारचा निर्णय हा पूर्णपणे मूर्खपणाचा असून पालकांनी आपल्या मुलांना परीक्षेला पाठवूच नये' असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. सरकारने घेतलेल्या सीबीएसईच्या फेरपरीक्षेच्या निर्णयावर आज ते बोलत होते.


सीबीएसईचा पेपर फुटल्याच्या घटनेवरून ठाकरे यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले. सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत या घटनेवरून सरकारचे अपयश पुन्हा एकदा जनतेसमोर आले आहे, असे त्यांनी म्हटले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पेपर फुटला पण सरकार आपली चुकी मान्य करण्याऐवजी मुलांनाच पुन्हा एकदा परीक्षा देण्यास भाग पाडत आहे. यावरूनच या सरकारची हुकुमशाही कार्यपद्धत कळून येते. त्यामुळे आता पालकांनीच यावर ठाम भूमिका घेत आपल्या मुलांना परीक्षेला पाठवूच नये' असा सल्ला त्यांनी दिला आहे.




केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीबीएसईच्या पेपर फुटीनंतर पुन्हा एकदा १० वीच्या परीक्षा घेण्याची घोषणा केल्यानंतर सध्या देशभरात पालक आणि विद्यार्थी यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. सरकार आणि सीबीएसईच्या या निर्णयामुळे सध्या पालक आणि विद्यार्थी यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच राज ठाकरे यांच्या आजच्या या वक्तव्यामुळे या मुद्दाचे देखील विरोधकांकडून राजकारण केले जाण्याची शक्यता आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'भरारी २०२५' हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर पनवेल येथे आज (दि. १०) आयोजित करण्यात आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121