प्रकाश आंबेडकरांना जे सांगितले, तेच विधानसभेत सांगितले !

    28-Mar-2018
Total Views | 18

 

 

 
 
भिडे गुरूजी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
 

एल्गारमुळे लोकांना लढायला जात आहोत असे वाटू लागले !

 

मुंबई : संभाजीराव भिडे गुरूजींची अटक व त्यांच्याबाबत असलेले पुरावे याबद्दल भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आदल्या दिवशी जे सांगितले तेच दुसऱ्या दिवशी विधानसभेत सांगितले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, डाव्या संघंटनांनी भीमा-कोरेगाव हिंसाचारापूर्वी आदल्या दिवशी पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे, भीमा-कोरेगावला जाणाऱ्या सामान्य भाविकांनाही आपण तिथे लढायला जात आहोत, असे वाटू लागल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सांगतेनंतर विधानभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. भीमा-कोरेगाव प्रकरणाविषयी ते म्हणाले की, मिलिंद एकबोटे हे घटनेच्या आदल्या दिवशी त्या भागात गेले होते. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. तसेच, व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्यांपैकी अनेकजण एकबोटेंशी संबंधित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, डाव्या संघटनांनी केलेल्या एल्गार मोर्चामुळे भीमा-कोरेगावला जाणाऱ्या सामान्य भाविकांनाही आपण लढाईला चाललो असल्याचे वाटू लागले. प्रत्यक्षात एल्गार परिषदेतील कोणीही भीमा-कोरेगावला मात्र गेले नाहीत, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, संभाजी भिडे गुरूजींच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या मोर्चादरम्यान घेतलेल्या भेटीत त्यांना मी जे सांगितले, तेच मी दुसऱ्या दिवशी विधानसभेत सांगितले, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबतच्या बातम्यांबाबत ते म्हणाले की, माझी उद्धव ठाकरे यांच्याशी संध्याकाळी सहा वाजता भेट ठरली होती. परंतु, अंतिम आठवडा प्रस्तावावर माझे उत्तर ५.३० वाजता सुरू झाले. ते ७ पर्यंत चालणार हे लक्षात आल्यावर मी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याद्वारे उद्धव यांना निरोप पाठवला. त्यानंतर, कामकाज संपल्यावर माझी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चाही झाली असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार नारायण राणे हे विधानभवनात आल्याबद्दल मला माहितीही नव्हती, हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121