प्लॅस्टिकवरील बंदी कितपत व्यवहार्य?

    27-Mar-2018
Total Views |

निफ्टीने १० हजार तर बँक निफ्टीने तोडली २४००० बिंदूंची पातळी
बाजाराला सर्वात जास्त भीती अमेरिकेच्या व्यापार युद्धाची
 

विदेशी गुंतवणुकदारांकडून होणार मोठी विक्री
देशातील नामवंत शिक्षण संस्थांना मिळणार स्वायत्तता
 
महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक व थर्मोकोलपासून बनविण्यात येणार्‍या अनेक वस्तूंवर बंदी घातलेली आहे. ही बंदी कठोरपणे लागू करुन तिचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात दंडासह कडक कारवाई केली जाणार आहे. तीत तुरुंगवासा चाही समावेश राहणार आहे. वस्तुत: देशभरा तच अशा प्रकारची बंदी लागू करणे आवश्यक असतांना ती काही राज्यातच लागू करणे कितपत व्यवहार्य आहे? असा प्रश्न तज्ञांना पडलेला आहे. आतापर्यंत १७ राज्यांमध्ये ही बंदी लागू आहे.
 
वस्तुत: घिसाडघाईने निर्णयाऐवजी सरकारने प्लॅस्टिकला पर्याय द्यायला पाहिजे होता. व्यापार्‍यांनीही यावर मत व्यक्त केले आहे की, अचानक लावलेल्या या बंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गोळा होणार्‍या प्रचंड प्लॅस्टिक कचर्‍या(प्रति वर्षी सुमारे साडे चार लाख टन)ला आवर घालण्यासाठी हे पाऊल सरकारने उचलले आहे. पण प्लॅस्टिकचा वापर थांबवला तर मालाची खरेदी व इतर लहानमोठी कामे कशी करता येणार? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे. सरकारनच्या या आदेशानुसार कोणताही दुकानदार किंंवा ग्राहक प्लॅस्टिकचा वापर करतांना सापडला तर त्याला पाच हजार ते २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. पण व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार या बंदीमुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
 
 
प्लॅस्टिकचा आपल्या पर्यावरण व प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असतो. विशेषत: प्लॅस्टिकच्या पाऊच किंवा बाटलीमध्ये विकले गेलेले पाणी आरोग्यास हानिकारक असते. कारण त्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण मिसळले जात असतात. सध्या प्लॅस्टिकच्या कपात गरम चहा पिण्याची प्रथा(‘फॅशन’) मोठ्या प्रमाणावर रुढ झालेली आहे. यामुळे तर या सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढतच असते. ते चहाबरोबर तसेच आपल्या पोटात जात असतात. त्यांचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. तसेच त्यांच्यामुळे कर्करोग (कॅन्सर) होण्याचीही शक्यता असते.
 
 
भारतातील लोकांचे चहा हे आवडते पेय बनलेले आहे. देशभरातील प्रत्येक गल्लीत चहाची दुकाने झालेली असून ती लोकांच्या एकत्र येण्याची ठिकाणे बनलेली आहेत. पूर्वी चहा चिनी मातीच्या कपात पिण्यात येत होता. नंतर तो काचेच्या पेल्यांमध्ये पिला जाऊ लागला. कालांतराने चहा ‘पार्सल’ म्हणून देण्यासाठी प्लॅस्टिकच्या थैलीचा वापर केला जाऊ लागला. बसल्या जागेवर चहा मिळावा हा त्यामागील हेतू होता. पण प्लॅस्टिकच्या कप हा पॉलिस्टायरिन या आरोग्याला अत्यंत विघातक असलेल्या द्रव्यापासून बनलेला असल्याने त्यातील व प्लॅस्टिक थैलीतील गरम चहा हानिकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता कागदी कपांमध्ये तो दिला जात आहे. सध्या सुमारे ८० टक्के दुकानांवर चहा कागदी कपातून दिला जातो.
 
 
सध्या भारतातील प्लॅस्टिकचा खप १ कोटी टनापेक्षाही जास्त असून तो दोनच वर्षात दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे जवळपास प्रत्येक वस्तू ही प्लॅस्टिकच्या आवरणात विकली जाते. आता तर औषधेही काचेऐवजी प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून मिळत आहेत. प्लॅस्टिक व थर्मोकोलच्या थाळ्या तर पाट्यांमध्ये जेवणासाठी वापरल्या जात आहेत अशा रीतिने प्लॅस्टिकची उपयुक्ततता वाढलेली असल्याने त्याचा संपूर्णपणे वापर बंद करणे अवघडच आहे. परंतु काही उपाययोजना करता येणे शक्य आहे.
 
 
बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी कापडी किंवा ज्यूटची बॅग वापरता येणे शक्य आहे. तसेच पार्ट्यांमध्ये प्लॅस्टिक थाळ्यांऐवजी पेपर किंवा सिरॅमिक प्लेट वापरणे व प्लॅस्टिकऐवजी घरुनच आणलेल्या काचेच्या बाटलीतून पाणी आणणे किंवा इतर द्रव पदार्थ आणि कॅरीबॅगऐवजी छोटी कापडी पिशवी खिशामध्ये ठेवणे सहजशक्य आहे.
 
 
प्लॅस्टिकच्या मोठया प्रमाणावर गोळा झालेल्या कचर्‍यावर पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग)ची प्रक्रिया करता येईल. तसेच तो रस्त्यांच्या बांधकामातही वापरता येईल. तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी मल्चिंगमध्येही प्लॅस्टिकचा वापर करता येईल. प्लॅस्टिक च्या आवरणाखाली असलेले शेतातील पाणी बाष्पीभवना मुळे हवेत लगेच निघून जात नाही. म्हणजे जेथे आवश्यक आहे तेथेच प्लॅस्टिकचा वापर केला पाहिजे.
 

मंदीच्या अस्वलांनी घेतली माघार, तेजीचे बैल उधळले चौखूर ! - गेल्या आठवडयापर्यंत गुदगुल्या करणार्‍या मंदीच्या अस्वलांनी अखेर आज सोमवारी माघार घेतली व त्याबरोबरच तेजीचे बैलही चौखूर उधळले! मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल ४६९ बिंदूंनी उसळून दिवसअखेरीस पुन्हा ३३ हजार बिंदूंची मानसशास्त्रीय पातळी गाठीत ३३ हजार ६६ बिंदूंवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १३२ बिंदूंनी वाढून १० हजार १३० बिंदूंवर बंद झाला. मात्र सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांनी अनुक्रमे ३२ हजार ६०० बिंदूंच्या व १० हजार बिंदूंच्या खालची पातळी गाठली होती.