कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची मुद्दत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |



बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाने अंतर्गत कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना अर्ज सदर करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा मुद्दत वाढवून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर केलेले नाही किंवा अर्ज सादर करता काही तांत्रिक अडचणी आल्या असल्यास त्यांनी येत्या ३१ तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
कर्जमाफी योजनेतंर्गत गेल्या वर्षी २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधी दरम्यान शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले होते. मात्र या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या कालावधीत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक अथवा तांत्रिक कारणांमुळे दिलेल्या मुद्दतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नाहीत. यावर राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्णय घेत शेतकऱ्यांना ३१ तारखेपर्यंत मुद्दत वाढवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळील महा-ई सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पद्धतीने आपला अर्ज सदर करावा किंवा http://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@