राज्यात सत्तापरिवर्तन होणारच : सुनील तटकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |



नगर : राज्यातील जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला असून जनतेचा संयमाचा बांध फुटत चालला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांनंतर राज्यात सत्तापरिवर्तन होणारच', असा ठाम विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. नगरमध्ये सुरु करण्यात आलेल्या 'हल्लाबोल यात्रे'ची माहिती देत असताना, आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीकडून नगरमध्ये काल एकूण तीन सभा झाल्या. या तिन्ही सभांना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून तरुणांच्या मनात किती रोष आहे हे पाहायला मिळत आहे. राज्यात महिला असुरक्षित आहेत त्यामुळे त्यांच्या मनातही किती खदखद आहे त्याही संतप्त आहे हे दिसून येत आहे. लोकांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे आणि नक्कीच येणार निवडणुकांमध्ये याचा राज्याच्या सत्तेवर परिणाम होणार. राज्यात परिवर्तन घडेल.' असे तटकरे यांनी म्हटले आहे.

याचबरोबर भाजप सरकारला लक्ष करत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांवर देखील त्यांनी तिरकस टीका केली आहे. भाजपची लाट पाहता अनेक जण भाजपमध्ये गेले खरे पण आता मोदींची लाट पूर्णपणे ओसरली असून पक्षांतर केलेल्या अनेकांचा तिकडे जाऊन भ्रमनिरास झाला आहे त्यामुळे या सर्वांची पुन्हा एकदा शंभर टक्के घरवापसी होणार, असे देखील तटकरे यांनी म्हटले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@