एका वेबसाईटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटंबातील सदस्यांचा आज नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्याक्रमात सत्कार करण्यात आला. “आता रस्तेवाहतुकी दरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर सहा तासांच्या आत त्याचे अवयवदान करता यावी अशी सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अवयअवदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तशी नोंद करण्यात येणार आहे.” असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
अवयवयदानाचे प्रमाण भारतामध्ये खूपच कमी आहे. योग्य वेळी अवयवाचे प्रत्यारोपण न करता आल्यामुळे भारतात दरवर्षी सुमारे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अवयवदानाचा दर वाढविण्यासाठी त्याबाबतीत लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. वाहतूक खात्याचा निर्णय येणाऱ्या काळात अनेकांसाठी जीवनदाता ठरणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/