निवडणुकीच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये. यासाठी कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कँप पोलीसांनी अहमदनगरमधील आजी, माजी आमदार, गुन्हे दाखल असलेले राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांना तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव दाखल केला आहे. पोलीसांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावर थोड्या थोड्या कालावधीच्या अंतराने सुनावणी करण्यात येईल.
श्रीपाद छिंदमसोबत ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे आणि दिपक खैरे या पाच जणांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत शहरातून तडीपार करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे. १५ दिवसांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुक काळातही श्रीपाद छिंदमला तडीपार करण्यात आले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/