“उद्धव ठाकरेंना मिळतील रामाचे आशीर्वाद”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2018
Total Views |



कराड : “शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणे चांगलेच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाण हे युतीसाठी पोषक आहे. उद्धव ठाकरेंना रामाचे आशीर्वाद मिळतील.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराड येथील प्रितीसंगमावर पुष्पांजली वाहण्यास आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना रामाचे आशीर्वाद मिळतील. राम मंदिर झाले पाहिजे हे सर्व हिंदू बांधवांना वाटते. प्रभू श्रीराम अवघ्या भारताचे अराध्या दैवत आहेत. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभू श्री राम नक्कीच आशिर्वाद देतील.”

 

मुख्यमंत्रांनी वाहिली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली

 

 
 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत एक फार मोठा वाटा यशवंतराव चव्हाण यांचा होता. महाराष्ट्राच्या प्रगतीकरता त्यांनी जी त्यांची भूमिका वठवली आणि पाया रचण्याचे काम त्यांनी केले. त्याचनिमित्ताने दरवर्षी आम्ही येऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो.” असे मुख्यमंत्रांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@