मराठी पत्रकार संघातर्फे कार्यशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |
तळोदा :
सकारात्मक पत्रकारिताकडे कल द्या, आपल्या सकारात्मक वृतांमुळे समाजात ऊर्जा निर्माण होते. माती अन माणसाची बातमी केल्यास ती हृदयस्पर्शी ठरते.
 
सोशल मीडियाच्या वाढता प्रकोप पाहता बातमीदाराने जबाबदारी लक्षात घेऊन वास्तव पत्रकारिता करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, यासाठी शब्दांचा भांडार अपेक्षित आहे.
 
समाजाशी नाळ जुळत नाही, तो पर्यंत खरा पत्रकार होऊ शकत नाही, पत्रकाराची भूमिका एकिकडे जुकता माफ न देता तठस्त असणे आवश्यक आहे. असे मत धुळे येथील एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभागा प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले.
पत्रकारांना एक चर्चेचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे निशुल्क जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तळोदा महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 
मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून धुळे येथील एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभागा प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण तसेच झी. 24 तासचे प्रशांत परदेशी हे होते.
 
याप्रसंगी पत्रकार हिरालाल चौधरी, बळवंत बोरसे, निलेश पवार, भिकेश पाटील, धनराज माळी, जयप्रकाश डीगराळे, जेष्ठ पत्रकार रमेशकुमार भाट, मंगेश पाटील, आदी उपस्थित होते.
 
चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, पत्रकारिता हे शस्त्र असून त्याचा वापर मीरवेगिरी करिता न करता समाजातील धगधगत्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी करा, पत्रकारांची भूमिका, बातमी म्हणजे काय? लेख, वार्तापत्र, अग्रलेख म्हणजे काय ? पत्रकारांची जबाबदारी आणि त्यातील बारकावे , इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यातील बदलते प्रवाह यासह विविध पत्रकारितेचे बदलते संदर्भ व इतिहास अश्या विविध विषयाबाबत सखोल माहिती दिली.
 
तर प्रशांत परदेशी यांनी पत्रकारिता आणि पत्रकार यासंबधी सध्या सुरू असलेले कार्य, देशातील पत्रकारितेची सद्यस्थिती डिजिटल युगाकडे वाढता कल यावर मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, सध्याची पत्रकारिता गतिमान झाली आहे.
 
क्षणातच ई-पेपरच्या माध्यमातून वृत्त प्रत्येका पावेतो पोहचत आहे. अफवा असलेल्या वृत्त तसेच खर्‍या खोट्या वृतांची शहानिशा करणे हे आव्हान पत्रकारितेत निर्माण झाले आहे.
 
यामुळे भविष्यात पत्रकारितावर देखील आचारसहिता लादली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली, बातमीकरीता न्यूज सेन्स व प्रबळ मध्यम असणे आवश्यक आहे. डिजिटल युगात संवादाची साधने वाढली असली तरी संवाद मात्र कमी झाली असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
 
या कार्यशाळेत शहादा, अक्कलकुवा ,नंदुरबार, दोंडाईचा, तळोदा धडगाव आदी तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले.
 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, सचिव सम्राट महाजन,उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, कोष्याध्यक्ष चेतन इंगळे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@