पर्यटन विकासातील अडथळे दूर होणार

    12-Apr-2017   
Total Views | 1

विविध विभागांशी समन्वयाचा नवा कायदा केला जाणार

महाराष्ट्रात नैसर्गिक व मानवनिर्मित पर्यटनस्थळांची संख्या मोठी असली तरी अद्याप पर्यटन व्यवसायाचा अपेक्षित विकास झालेला नाही. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे यामागील प्रशासकीय यंत्रणा अनेक विभागांमध्ये विभागली गेली असल्याने यांमधील समन्वयाचा अभाव व विविध विकासकामांसाठी लागणाऱ्या परवानग्या. उदा. गडकिल्ले सांस्कृतिक कार्य विभागाकडे तर जंगले वन विभागाकडे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला असून जिथे पर्यटन विकसित होईल अशा ठिकाणी यापुढे केवळ पर्यटन विभागच कार्यरत राहील अशा स्वरूपाचा कायदा राज्य सरकार येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे.

राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना आज याबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाचे अनेक विभाग ज्यांचा कुठे ना कुठे पर्यटनाशी संबंध येतो, उदा. सांस्कृतिक कामकाज, वन, परिवहन आदी विभागांचा व पर्यटन विभागाचा समन्वय कमी पडतो आहे का व तो झाल्यास राज्यातील पर्यटनाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो का असा प्रश्न विचारला असता रावल यांनी अशा प्रकारच्या समन्वयाचा आतापर्यंत अभाव राहिला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पर्यटन विभागाची व्याप्ती खूप मोठी असून यामध्ये गडकिल्ल्यांपासून, मंदिरे, जुन्या वास्तू, जंगले, समुद्र, नद्या-तलाव, शेती-बागायती अशा सर्वच गोष्टींचा कुठे ना कुठे संबंध येत असतो. त्यामुळे या विभागांच्या आपापसातील समन्वयासाठी सरकार सध्या गांभीर्याने प्रयत्न करत आहे.

सरकारमधील आम्ही सर्व मंत्री एक परिवार म्हणून काम करतो त्यामुळे सर्वांनीच याला अनुकुलता दर्शवली असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले. या नव्या प्रस्तावानुसार ज्या ठिकाणी पर्यटन विकसित करण्याची क्षमता आढळून येईल त्याठिकाणी पर्यटन विभाग काम करेल. इतर विभागांकडून ते ठिकाण पर्यटन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल. तसेच विविध विकासकामांसाठी या सर्व विभागांच्या परवानग्या हाही एक अडसर राहत असून त्यामुळे आता केवळ पर्यटन विभागाची परवानगी मिळाली की सर्व विभागांची परवानगी मिळाली अशा स्वरुपाची तरतूद करण्यात येणार असल्याचे रावल म्हणाले. तसेच याबाबतचा एक सर्वंकष कायदा येत्या जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात सादर केला जाणार असल्याचेही पर्यटन मंत्री रावल यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’सोबत बोलताना स्पष्ट केले.

निमेश वहाळकर

निमेश वहाळकर

सध्या मुंबई तरूण भारत मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत. मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 

अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121