#खंडित स्वातंत्र्य भाग- २

    18-Aug-2016   
Total Views | 1


डायरेक्ट एक्शनची भिती


भारतात जेंव्हा १८५७ चं स्वातंत्र्य संग्राम संपलं तेंव्हा अमेरिकेचं दृश्य भयानक होतं. १८६१ ते १८६५ पर्यंत तिथं गृहयुद्ध सुरु होतं. अमेरिकेच्या ३४ प्रांतांपैकी दक्षिण अमेरिकेतील ११ प्रांतांनी गुलामगिरीच्या समर्थनात तर इतर (उत्तरी) प्रांतांनी ‘यूनियन’च्या विरोधात युद्ध पुकारलं होतं. त्यांचं म्हणणं होतं “आम्ही विचारांच्या आधारावर देश चालवणार, यासाठी आम्हाला वेगळं राष्ट्र हवं.”


अमेरिकेच्या सौभाग्यानं त्याला अब्राहम लिंकन सारखा राष्ट्राध्यक्ष मिळाला. लिंकननं अमेरिकेच्या फाळणीचा पूर्ण ताकतीनिशी विरोध केला. गृहयुद्ध तर झालं मात्र फाळणी टळली. आणि आज? आज अमेरिका विश्वातील सर्वात मोठी आर्थिक आणि लष्करी ताकद आहे. १८६१ मध्ये अमेरिकेची फाळणी झाली असती तर आज अमेरिका विश्वातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र बनू शकलं असतं?
उत्तर आहे – नाही !


अमेरिकेला सौभाग्य लाभलं असलं तरीही आपलं मात्र दुर्भाग्य होतं की, आपल्या देशाचं नेतृत्व फाळणीच्या वेळेला चुकीच्या हातांत होतं. ज्यांनी घाबरुन, संकोचामुळे, असहिष्णुतेनं देशाची फाळणी स्वीकारली. भारताला अब्राहम लिंकन सारखं नेतृत्व मिळालं असतं तर भारताचा इतिहास, भूगोल आणि वर्तमान कितीतरी पटीनं समृद्ध असता.


तत्कालीन नेतृत्वानं कधीच मुस्लिम लीग विरोधात मोकळेपणानं ठाम भूमिका घेतली नाही आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक होती. गांधीजी आणि कांग्रेसच्या काही नेत्यांची अशी अपेक्षा होती, की मुस्लिम लीगच्या सर्व मागण्या पूर्ण केल्यास त्यांचं “हृदय परिवर्तन” होईल. पण ते शक्य नव्हतं आणि तसं झालंही नाही.


१९३० मध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या अलाहबाद अधिवेशनात मंचावरुन कवी इकबाल (ज्यांनी सारे जहाँ से अच्छा या अजरामर गीताची रचना केली) म्हणाले की, "मुसलमानांना वेगळी भूमी ही मिळायलाच हवी. हिंदु नेतृत्व असलेल्या राष्ट्रात मुसलमानांना त्यांचा धर्म पाळणं शक्य होणार नाही."
वेगळी भूमी, वेगळ्या राष्ट्राचं स्वप्न भारतातील मुसलमान बघू लागले. लंदन मध्ये बसून रहमत अलीनं कवी इकबालांच्या भाषणाचा आधार घेत मुस्लिम राष्ट्रासाठी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात मुस्लिमराष्ट्राचं त्यांनी दिलेलं नाव होतं, "पाकिस्तान".


हे आपलं दुर्भाग्य होतं की गांधीजी आणि तत्कालीन नेतृत्वाला या घटनेचं गांभीर्य समजलं नाही. वरुन मुस्लिम लीग दंगल भडकवण्याची, अशांतता पसरवण्याची भिती दाखवत होती. काही प्रमाणात त्यांनी अशांतता पसरवली देखील. या दंगलींमध्ये कांग्रेसची निष्क्रीय भूमिका असायची. त्याचं एकमेव कारण म्हणजे गांधीजींचं अहिंसेचं व्रत. याच काळात झालेल्या एका भाषणात गांधीजींनी "मला स्वातंत्र्य आणि अखंडतेपेक्षा अहिंसा प्रिय आहे. हिंसेनं जर अखण्डता आणि स्वातंत्र्य मिळणार असेल तर ते मला नको." असं मत व्यक्त केलं होतं.
एक अब्राहम लिंकन होते ज्यांनी दूरदर्शितेनं हिंसा आणि गृहयुद्ध पचवून सुद्धा अमेरिकेला एकसंध ठेवलं. आणि जगातील सगळ्यात श्रेष्ठ राष्ट्राचा निर्माण झाला.


हिंसेच्या भितीनं, प्रतिकार करण्याच्या संकोचानं भारतातील तत्कालीन नेतृत्वानं फाळणी स्वीकारली.
पुढे मुस्लिम लीगनं डायरेक्ट एक्शन ची धमकी दिली. " पाकिस्तानच्या निर्माणाला परवानगी द्या नाहीतर १६ ऑगस्ट रोजी आम्ही 'डायरेक्ट एक्शन' घेवू." अशी भूमिका मुस्लिम लीगनं घेतली.


त्यावेळी अखंड बंगालचे मुख्यमंत्री हसन सुऱ्हावर्दी होते. त्यांनी १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या काळात ४ हजार हिंदुंच्या कत्तली घडवून आणल्या. २० हजार हून अधिक हिंदू गंभीर जखमी झाले होते. अनेक हिंदू महिलांच्या अब्रू सोबत खेळ करण्यात आला.
याच डायरेक्ट एक्शनला कांग्रेसी नेतृत्व घाबरलं. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक होती. याचा प्रतिकार करणं शक्य होतं. जगासमोर मुस्लिम लीगच्या या कृत्याला मांडून तोडगा काडला जावू शकत होता. आपल्यात प्रतिकार करण्याची क्षमता देखील होती. मात्र आपण तो केला नाही.


अखण्ड भारताच्या पश्चिम प्रांतात सगळ्यात जास्त हिंदू होते. इरानला लागून असलेल्या बलुचिस्तान आणि त्याच्या शेजारी असलेल्या सिस्तान प्रांतात अनेक सिंधी बंधु होते. क्वेटा, डेरा बुगती, पंजगुर, कोहलू, लोरालई पासून ते कराची, हैदराबाद पर्यंत अनेक सिंधी बंधू हजारो वर्षांपासून राहत होते. पश्चिमेतून येणाऱ्या सर्व आक्रमणकाऱ्यांची नजर सगळ्यात आधी या सिंधी बांधवांवर पडली. मात्र ते सर्व बांधव राजा दाहीरचे वंशज होते. ते पराक्रमी होते, शूरवीर होते. इतके आक्रमण होवून सुद्धा त्यांनी आपला धर्म सोडला नाही आणि आपली जमीनही सोडली नाही.
भारताचं दुर्भाग्य की तत्कालीन नेतृत्वानं फाळणी स्वीकारली. कांग्रेस वर्किंग कमिटीच्या या निर्णायांनं या पराक्रमी योद्धांना, अगम्य साहस दाखवणाऱ्या या वीरांना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहण्याची क्षमता असलेल्या या सिंधी बांधवांना आपली वारसाहक्क असेलली जमीन सोडावी लागली !
(क्रमश:)....

भाग १ 

 

प्रशांत पोळ

आयटी क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव. विविध मोठ्या कंपन्यांसाठी आयटी कन्सल्टंट. 'भारतीय ज्ञानाचा खजिना' या पुस्तकाचे लेखक. भारतीय इतिहासावर गहन अभ्यास. साहित्य, संस्कृती, इतिहास, तंत्रज्ञान या विषयावर लेखनाची आवड. हिंदुत्ववादी विचारधारा जोपासणारे लेखक. 

अग्रलेख
जरुर वाचा
ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121